लॉकडाऊन सुद्धा पोलिसांचीच जबाबदारी आहे का ?

लेख
लॉकडाऊन सुद्धा पोलिसांचीच जबाबदारी आहे का ?
जगभरात करोना विषाणू आपले मृत्यू तांडव करत असताना ते थांबवण्याचा एकमेव उपाय म्हणून भारत सरकारने देशभरात लॉक डाऊन करण्याचा खुप कठीण तेवढाच धाडसी निर्णय घेतला आणि समस्त देशवासियांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन वजा विनंती हात जोडून देश्याच्या प्रधानमत्र्यानी केली.
देशाची आरोग्य यंत्रणा तसेच बाकी यंत्रणा आपआपली कर्तव्ये खूप चांगल्या प्रकारे निभावत असतांना बाहेरील कायदा, सुव्यवस्था व सुरक्षेची जबाबदारी अर्थातच माझ्या पोलीस बांधवांवर आली आहे.
“सदराक्षणाय खलनिग्रनाय” हे पोलिसांचे ब्रीद. सद् म्हणजे चांगले आणि राक्षणाय म्हणजे रक्षण तसेच खल म्हणजे देशविघातक समाज विघातक प्रिवुत्तीला आळा घालणे होय. आज करोना सारखा हजारो जीव घेणारा हजारो कुटुंब उध्वस्त करणारा आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण आपल्या घरातच रहायला पाहिजे ही सुद्धा पोलिसांची च जबादारी आहे का? हा आज पडलेला खुप छोटा तितकाच किचकट प्रश्न. देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये काही जबाबदाऱ्या आहेत की नाही?
दिवाळी, दसरा, पोळा, रमजान, ईद, ख्रिस्तमस, गणपती उत्सव असो की नवरात्र, मिरवणूक असो की मोर्च्या, उठसूट होणाऱ्या निवडणुका असो की व्ही.आय.पी. सुरक्षा, रात्रीची गस्त असो की समाजिक गुन्हे रोखण्यासाठी आपले पोलीस बांधव दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत असतात. शेवटी पोलीस सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही घरदार, मुलेबाळे आहेत त्याच्या ही त्याच्या परिवारा प्रति काही जबाबदाऱ्या आहेत. वरशाती8 365 दिवसांपैकी पोलीस 306 दिवस प्रत्यक्ष कर्तव्यावर हजर असतो. 12 तास प्रत्यक्ष आणि 12 तास अप्रत्यक्ष. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने वाढलेला कामाचा व्याप त्यामुळे वाढलेला थकवा, चिडचिड, रागावणे ह्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे तसेच सततच्या ताणतणावामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगा सारख्या शारीरिक व्याधी नी सुद्धा ग्रासले आहेत. गंमत म्हणजे पोलिसांची कोणतीच संघटना नसल्यामुळे ते त्यांचे दुःख शासन दरबारी सुद्धा मांडू शकत नाहीत.
आधीच एवढ्या समस्यांना तोंड देणाऱ्या माझ्या पोलीस बांधवांसमोर हे नवीन संकट करोना नावाने येऊन ठेपले आहे ज्यापासून ह्यांना सर्व नागरिकांची तसेच स्वतःची रक्षा करायची आहे. ज्यांना ह्या विषाणू ची लागण झाली आहे त्यांना वाचविण्याचे सर्व उपाय आपले वैद्यकीय सेवा देणारे लोक करतच आहेत परंतु इतर कोणाला ह्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून हा 21 दिवसांचा लॉकडॉवन संपूर्ण देश्यात लावण्यात आल्या पासून वृत्तवाहिन्या मधून रोज नवनवीन संताप आणणारे गोष्टी पाहण्यात येत आहेत काही ठिकाणी पोलीस लोकांना हात जोडून घरात बसण्याची विनंती करत आहेत तर कुठे गुलाबाची फुले देऊन कुठे मोठे पोलीस अधिकारी कविता म्हणून तर कुठे हिंदी चित्रपटातील काही गाणी म्हणून घरात राहण्याचे आवाहन करत आहेत तर कुठे एका फोन कॉल वर घरपोच औषध, दूध, भाजीपाला जेवणाची पाकिटे पोचवत आहेत. ह्याउलट जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणाऱ्या माझ्या पोलीस बांधवांची अवहेलना वा अपमान होतांना दिसला की संताप येतो आणि असल्या असवेदनशील समाजाची लाज सुध्दा वाटते. 
असेच मुंबई मधल्या एका उच्चभ्रू वसाहतीतील एक महिला पोलिसांवर अतिशय चुकीच्या शब्दांत ओरडते, काही ठिकाणी काही महिला पोलिसांनी बांबू चा एक फटका मुलाला मारला म्हणून पोलिसांवर हात उचलते, इचलकरंजी मध्ये पोलिसांवर दगडफेक होते, काही गरजू लोकांना पोलीस काही वस्तु घरपोच देतात म्हणून काही बेशरम मूर्खांधीपती चला ट्राय करून पाहू म्हणून पोलिसांना फोन करून त्रास देत आहेत कुठली ही मानसिकता.
आज मुख्य सामाश्या म्हणजे ह्या वैश्विक संकाटातून बाहेर निघणे आणि ते आपण आपल्या घरात बसून च निघू शकतो. म्हणुन आज देश्याच्या एक सुजाण आणि जबाबदार नागरिक असल्याने हे आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या पोलिस बांधवाचा ताण काही अंशी कमी करूयात.
घरात राहून आपली आपल्या परिवाराची सोबत देश्याची काळजी घेऊ या।
ईश्वर लवकर ह्या संकटातून देशाला बाहेर काढो हीच प्रार्थना.
(फोटो सौजन्य – गुगल व theprint)

सचिन शेगोकर

सचिन शेगोकर, अकोला. महाराष्ट्र. pharmaceutical company मध्ये नोकरी. सामाजिक व राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत.

Comments (1)
Add Comment
  • Varsha

    Nice thought