समलैंगिक विवाह – भारतीय समाज व्यवस्थेला घातकच

समलैंगिक विवाह – भारतीय समाज व्यवस्थेला घातकच

गत काही दिवसांपासून समलैंगिक विवाहला मान्यता द्यावी अश्या अनेक याचिका मा. सर्वोच्च न्यायालयात आल्या आहेत. आणि त्यावर न्यायालयात सुनावणी सुद्धा सुरू आहे….

केंद्र सरकारने या याचिकेला स्पष्ट विरोध दर्शवून आपली भूमिका न्यायालयासमोर स्पष्ट केलेली दिसतेय. सरकार कडून आपली भूमिका सॉलिसिटरजनरल मेहता यांनी अगदी स्पष्ट रित्या मांडली आहे.

परंतु हा विषय मा. सर्वोच्च न्यायालयाने डोक्यावर का घेतला आहे याचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

 देशात लोकसंख्या वाढ, समान नागरी कायदा असे अनेक महत्त्वाचे विषय समोर असताना सुद्धा या विषयाला एवढे महत्त्व द्यायचे कारण अजून तरी स्पष्ट झालेलं नाही.

जेमतेम बोटावर मोजता येईल एवढे टक्के असणारे समलैंगिक विवाहाशी निगडित लोकांना पहिल्या पंगतीत आदर सत्कार देण्याचे कार्य मा. सर्वोच्च न्यायालय करतेय.

नेमका हा समलैंगिक प्रकार काय आहे … या वर बऱ्या पैकी अभ्यास केल्यावर लक्षात येईल की, हा प्रकार प्रामुख्याने पाश्चिमात्य संस्कृतीची देण आहे.

हि एक अशी विकृती आहे जी मानवी समाजाला गिळून टाकेल. आणि आज जे लोक समलैंगिक विवाहाला मान्यता द्या अशी मागणी करतात आहे. उद्या याच खेम्यातील लोक कुत्रा ,मांजर आणि प्राण्यांशी शारीरिक संबंध ठेण्यासाठी न्यायालयात मंजूरी मागतील. हा प्रकार इथेच थांबवला नाही तर …येत्या काळात याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील.

एक नजिकचे उदाहरण म्हणजे …. न्यू यॉर्क मधील एलिझाबेथ होडने लाइव्ह टीव्ही शोमध्ये तिचा कुत्रा लोगानशी लग्न केले. याआधी शोमध्ये दिसलेली होड म्हणाली की तिला पुरुषाची गरज नाही, आणि तिला तिचे उर्वरित आयुष्य कुत्र्यासोबत घालवायचे आहे, असे द सनच्या वृत्तात म्हटले आहे.

असे एक नाहीतर अनेक उदाहरणे आपल्याला भविष्यात बघायला मिळतीलच परंतु भारत देश यापासून खूप लांब होता .मात्र LGBTQAI + या समुदायाने भारतात सुद्धा आपले पाय रुजवायला सुरुवात केली आहे. आणि त्याची पहिली पायरी आज सर्वोच्च न्यायालयात चढताना दिसत आहे.

2017 मधे नवतेज सिंह वि. भारत सरकार या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना वैध ठरवून मान्यता दिली आहे. आणि section 377 अवैध ठरवली आहे…. समलैंगिक विवाहची खरी सुरुवात इथूनच झाली.

समलैंगिक विवाहवर केंद्र सरकारची भूमिका …….

केंद्र सरकारने लग्नाला मान्यता द्यावी या याचिकांचा विरोध केला आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणीच करू नये असं सरकारला वाटतं. विवाहाला मान्यता देणं हे एक विधायक कार्य असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यावर न्यायालयाने निर्णय घेऊ नयेत.

समलिंगी विवाहांना मान्यता देण्याआधी शहरी ग्रामीण, अर्ध ग्रामीण सर्व पैलुंवर विचार करायला हवा, समलिंगी विवाह ही उच्चभ्रू वर्गाची विचारसरणी आहे. त्यात संपूर्ण देशाचा विचार केलेला नाही.

विवाहाच्या परिभाषेत एक पुरुष आणि महिलेचाच समावेश होतो असं सरकारचं मत आहे.

समलैंगिकता हा एक पाश्चिमात्य विचार आहे. जसं घटना बदलली जाऊ शकत नाही तसंच लग्नाचा मुलभूत विचारही बदलला जाऊ शकत नाही. समलिंगी विवाहाला मान्यता दिली तर सामाजिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. हे भारताच्या कुटुंबपद्धतीविरोधात आहे. दत्तक घेणं, घटस्फोट, वारसा हक्क इत्यादी मुद्द्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होईल. नव्या सामाजिक संबंधावर निर्णय घेण्याचा हक्क फक्क संसदेला आहे.

याचिकाकर्ते यांची सर्वोच्च न्यायालयात एकंदरीत मागणी ……

देशाच्या वेगवेगळ्या भागातून 20 याचिका दाखल केल्या होत्या. मात्र प्रमुख याचिकांमध्ये हैदराबादमध्ये राहणारे गे कपल सुप्रिया चक्रवर्ती आणि अभय डांग यांच्या या याचिकेत समावेश आहे.

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता न मिळणं समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे. स्पेशल मॅरेज अक्ट फक्त स्त्री आणि पुरुषांच्या विवाहाला मान्यता देतं. त्यामुळे हे जेंडर न्यूट्रल करायला हवं.

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता न मिळाल्यामुळे अनेक जोडप्यांना पायाभूत सुविधा मिळत नाही, मालमत्तेत नामांकन, दत्तकविधान, कर सवलत अशा कितीतरी गोष्टीत त्यांना विवाहित जोडप्याला सुविधा मिळतात. त्या समलैंगिक जोडप्याला मिळत नाहीत….

समलैंगिक विवाहाला वेद आणि भारतीय धर्मशास्त्रांशी जोडण्याचे क्रूर कृत्य तसेच हिंदू धर्माला बदनाम करण्याचे कार्य याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे….

परंतु खरं सत्य आज आपल्या समोर मांडतोय … असे म्हटले जाते की 2-3 व्या शतकात समलिंगी विवाह खूप सामान्य झाले.

 ख्रिश्चन आणि इस्लामच्या उदयाबरोबर समलैंगिकांचे शोषण वाढले.

1. पहिला समलैंगिक विवाह इंग्लंडचा राजा जेम्स-1 याने केला. याला अनेक पुरुषांसोबतच्या संबंधामुळे ओळखले जाते. त्याने यामधील एका स्कॉटिश श्रीमंत पुरुषाशी विवाह केल्याचेही सांगितले जाते.

2.चीनच्या हान राजवंशात हुआ तुओ हे एक चिकित्सक होते. त्यांनी त्यांचा पुरुष साथीदार आणि संगीतकार झोंगजिंगशी लग्न केले असल्याने प्रचिलित आहे.

3.प्राचीन ग्रीस मध्ये सोप्पो नावाची एक कवयत्री होती. त्यांनी महिला दरम्यान प्रेमा बद्दल लिहिले. वास्तविक याचा कोणताही पुरावा नाही की, त्यांनी एखाद्या स्त्रीशी विवाह केला होता. पण तटी त्यांना समलिंगी प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

वरील उदाहरणावरून आपल्याला स्पष्टता येतच असेल की हि समलैंगिक घाण नेमकी आली कुठून …

परंतु उगीचच आयाप्पा स्वामी हे शिव आणि विष्णूचे पुत्र आहेत आणि शिव आणि विष्णू यांचा समलैंगिक विवाह झाला होता असे वायफळ तर्क सर्वोच्च न्यायालयात मांडल्या जात आहेत.

आणि हे सर्व विषय मांडणारे तेच लोक आहेत जे आज पर्यंत राम ,कृष्णा, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना दंत कथेचे पात्र मनात होते … मात्र आज जेव्हा पाश्चिमात्त्य विकृतीचे उदाहरण द्याची वेळ आली तर सर्व दंत कथा सत्यात उतरल्या वा! काय दोंतोंडी लिब्रांडू आहेत हे…..

भारतीय संस्कृती कधीच निसर्गाच्या विरोधात कार्यरत नाही… आपली एकमेव निसर्ग पूजक संस्कृती आहे. आपण निसर्गाचा आणि निसर्ग नियमांचा मानचं ठेवला आहे. नेहमी आदरच केला आहे.

अश्या ह्या समृध्द देशात जिथे ब्रम्हचर्य अग्नी सारखे साक्षात अनेक महात्मा मधे प्रज्वलित दिसते, जिथे आज सुद्धा घरा घरात ,काम ,मोह ,लोभ ,मत्सर य सर्व रिपुंचा त्याग करणायची शिकवण दिली जाते …. ज्या देशात सांसारिक जीवन जगता जगता सन्यास घेण्याची तत्वे सांगितले जातात अश्या विश्व गुरू पदी विराज असलेल्या देशात समलैंगिक विवाहला मान्यता मिळावी याची बिलकुलही गरज भासत नाही…

पाश्चिमात्य LGBTQIA + सारख्या समुदायाला आपले पाय रुजवायला आज सर्व स्तरातून भक्कम जनमत मिळतेय …हे खरच दुर्दैवी आहे.

हा विषय खरोखरच मुळासकट उपटून काढायला हवा….हा विषय एका आतंकवादी टोळीला देशात पाळण्या इतकाच गंभीर आहे.

LGBTQIA+ हा समुदाय विशिष्ट आपल्या मागण्या मान्य करून वेगवेगळे देशविघातक लोकांना समलैंगिक विवाह पद्धतीने भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी सर्व धडपड करतोय … असे अनेक पुरावे भारतीय गुप्त खात्याला सतत मिळत आहे …केंद्र सरकार याला मान्यता देणार नाही. म्हणून न्यायालयीन पद्धतीने भारतात प्रवेश कसा मिळवता येईल याची योजना या समुदायाची तयार झाली आहे.

याचे दूरगामी परिमाण खूपच घातक आहेत…

हा भारतीय विवाह संस्थेवर आणि भारतीय संस्कृतीवर एक मोठा आघातच आहे…

भारत माता की जय …

– संकेत राव ✍️

संकेत राव

लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजातील वाईट प्रथा आणि गौरवशाली इतिहास तसेच इस्लाम धर्माचे अभ्यासक आहेत.

Comments (0)
Add Comment