सत्तेचे शिवधनुष्य आणि शिवसेना

लेख

यापेक्षा मैदान बरे…..!

मोठ्या राजकीय घडामोडी नंतर नुकतेच शिवसेना – रा.कोंग्रेस – कोंग्रेस आणि समर्थक एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना पक्ष प्रमुख यांचे नेतृत्वात सरकार स्थापन केले. त्याबदल नवीन सरकार चे हार्दिक अभिनंदन !

 

भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र येत किमान समान कार्यक्रमावर एक मत करत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून हे सरकार स्थापन झाले. यासरकारने शपथविधी मोठ्या धूम धडाक्यात एखादी जाहीर सभा असावी अशा ऐटीत घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नवीन अध्ययला सुरुवात झाली. येण – केण प्रकारेण शिवसेनेचे उद्धव ठाकरे यावेळी  मुख्यमंत्री झालेच पाहिजे असा चंग बांधलेल्या अनेक नेत्यांना गंगेत घोडे न्हाले असेच वाटले असणार.

झालेला शपथविधी हा नियमांनुसार नाही असा विरोधी पक्षाने आरोप करत पहिलाच दणका विरोधी पक्षाने सरकारला देत विरोधीपक्ष  सुद्धा सज्ज असल्याचे जनतेच्या निदर्शनास आले.

विधानसभा निवडणुकी पूर्वी महायुती म्हणून आम्ही सत्ता स्थापन करून आणि  राज्यकारभार चालवू असे दिलेले वचन सोडून जाहीर नाम्यातील इतर वचनपूर्ती करण्याचे मोठे आव्हान या सरकार समोर आहे. एकूणच तीन पायांची शर्यत असणार्‍या या सरकारमध्ये एका एका मुद्यावर एकमत करत समन्वय साधताना नवख्या  मुख्यमंत्र्यांची चागलीच दमछाक होताना  येणार्‍या काळात आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव नसणारे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे अनुभवी आणि कायदा व सरकार मधील बारीक सारिक खाच खडगे माहिती असणारा विरोधीपक्ष नेता आणि एकसंघ विरोधी पक्ष, सरकरमधील सहकारी असणारे राष्ट्रवादी, कोंग्रेस , मधील मात्तबर आणि  सत्तेचा बराच अनुभव असणारे नेते आणि शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून वावरण्याची उद्धव ठाकरे यांची वावरण्याची असणारी सवय पाहता सरकार चालवणे आणि मातोश्रीवरून आदेश देणे यातील फरक नवीन मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळेले हे मात्र नक्की.

परवा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्राकाराने विचारलेल्या  प्रश्नाला  उत्तर देताना जाप्रमाणे उद्धव ठाकरे चिडले आणि काल विधानसभे मध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधीपक्षाने आरोप करत वाक – आऊट केले आणि त्यांनातर जाप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडत ” यापेक्षा मैदान बरे ” असे हताश उद्गार पहिल्याच दिवशी काढले त्यावरून सरकार चालवताना त्यांची दमछाक तर होणार नाही ना ? असा प्रश्न जनतेच्या मनात डोकावतो आहे.

मागील फडणवीस सरकारने सुरू केलेले  समृद्धि महामार्ग, मराठवाडा वाटर ग्रिड प्रोजेक्ट, मेट्रो, अमृत योजना, मेक इन महाराष्ट्र सारखे महत्वाचे प्रकल्प हे सरकार किती नेटाने पुढे नेते व पूर्ण करते हा प्रश्नच आहे. विविध देशांशी मुत्सद्देगिरी करून मोठमोठ्या कंपण्याकडून महाराष्ट्रात विकाससाठी पैसा उभा करणे आणि प्रकल्पाला चालना देणे, नवीन प्रकल्प उभारणे, उद्योग, शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा विविध आघाड्या सामभाळणे , सरकार म्हणून विकासाचे धोरण ठरवणे अशा अनेक विषयात नवख्या  मुख्यमंत्री महोदयना खूप मेहनत घ्यावी लागेल असे एकूणच चित्र समोर दिसत आहे.

कोंग्रेस आणि रा.कोंग्रेस मधील मात्तबर नेते खरच अशा सर्व विषयात उद्धव ठाकरेंना मदत करतील का ? आपला अनुभव पणाला लावत अनेकानेक अडचनीमध्ये मार्ग काढत राज्य शासनाचा गाडा समोर नेत सर्व क्रेडिट शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना देतील का ? असे अनेक प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने जनतेच्या मनात उपस्थित होताहेत.

पक्षबांधणी, संघटन चालवणे, पक्षप्रमुक म्हणून कार्यकर्त्यांशी वागणे, त्यांना सूचना करणे असा एकूणच स्वभाव असणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपल्या सोबत असणार्‍या इतर पक्षातील  मातब्बर सहकारी नेत्यांना सन्मान देत समन्वय साधत किती पुढे जातता आणि आपला कार्यकाळ पूर्ण करतील का हे येणारा काळच सांगेल. 

  • नितिन राजवैद्य. 

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment