ब्रिटिशी जाती व्यवस्था …. इसाई मिशनरींची संकल्पना..!

0 315

ब्रिटिशी जाती व्यवस्था …. इसाई मिशनरींची संकल्पना..!

१८७१ मधे ब्रिटिश सरकारने कास्ट (Caste) शब्द भारतात खऱ्या अर्थाने वापरणे सुरू केले, तत्पूर्वी caste सारखा कुठलाही शब्द भारतात नव्हता. फक्त ४ वर्ण होते यात मात्र काही शंका नाही, भारतीय वर्ण व्यवस्था हि स्थायी स्वरूपाची नव्हती, म्हणजेच इथला शूद्र हा ब्राम्हण सुद्धा होऊ शकत होता. वर्णव्यवस्था हि अस्थायी अशी व्यवस्था होती. मात्र स्वतःचा स्वार्थ बघून ब्रिटिश सरकारने या व्यवस्थेला स्थूल केले. म्हणजेच शूद्र का नेहमी शुद्रच राहील. आणि ब्राम्हण हा नेहमी ब्राम्हणच
आणि याच निर्णयापासून भारतात खऱ्या अर्थाने जातीव्यवस्था मूळ रूप घेऊन विकसित होत गेली. आणि सामाजिक एकात्मतेला खंडित करीत गेली, आणि आज सुद्धा करीत आहे…..
मात्र या समृद्ध, बलशाली, साक्षर समाजावर हा जातीवाद नावाचा फासा कसा काय अडकवला असेल ?
याचे उत्तर काही विशेष संदर्भातून सुद्धा घ्याची गरज नाही …
तुम्ही सोपं उदाहरण घेऊ शकता जेव्हा … आपली आर्थिक, सामाजिक आणि शारिरीक समृध्दी होते, तेव्हाच आपण अध्यात्मात किंवा साहित्यात विशेष प्रगती करू शकतो.
मग खरंच या देशात पूर्वी पासूनच टोकाचा वर्णभेद किंवा जातीवाद असता तर ..आपल्या भारतीय संस्कृतीची एवढी प्रचंड प्रगती झाली असती का? आपल्याला वेद , उपनिषद रामायण, महाभारत, अद्वैत, पतंजली योग सूत्र, लीलावती, गीता, अष्टावक्रा गीता, महासिद्धांत, महशतिका, आगम सूत्र, त्रिपटीका तसेच भागवत सारखे महाकाव्य, सिद्धांत मिळाले असते का?
वैज्ञानिक शोध, गणितीय शास्त्राचे, खगोलीय शास्त्राचे , ज्योतिष शास्त्राचे शोध लावता आले असते का?
जर खरंच आपल्या देशात पूर्वी पासूनच अराजकता आणि टोकाची जातीवादी वृत्ती असती तर जगाला “वसुधैव कुटुम्बकम्” ची शिकवण आपण देऊ शकलो असतो का?
जैन आणी बौद्ध संप्रदायाचा देश विदेशात विस्तार झाला असता का ?
एवढेच नाही तर… भारतीय स्थापत्यकलेचा विकास झाला असता का ? खुजराहो सारखे मीनाक्षी मंदिर सारखे स्थापत्याचा उत्तम नमुना असलेले मंदिर निर्माण झाले असते का ?….
त्या काळात भारत संपूर्ण जगाच्या 33% GDP असणारा एकमेक आर्थिक दृष्ट्या सक्षम देश होता, मग खरंच जर देशात जातीय दंगली, वर्णभेद , अराजकता असती तर एवढं वैभव शक्य झाले असते का ?
मुळीच नाही ….!
म्हणजेच यावरून लक्षात येऊ शकते की जातीवाद हि कीड मध्यकालीन इतिहासात बाहेरून आलेल्या दृष्ट शक्तींनी लावली आहे…
त्यात एकच शैतानी शक्ती नव्हती तर चार महत्त्वाच्या सत्ता होत्या त्यापैकी पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि इस्लामी आक्रमक….
इस्लामी आक्रमक सर्वात अपयशी जर कुठे झाले असतील, तर एकमेव हिंदुस्तानातच , जिहादी वृत्तींना भारताची एकात्मता तोडता तोडता स्वतःचेच ४ तुकड्यांमध्ये विभाजन बघावे लागले.
आणि मग त्यांनी मंदिर ,मठ , धर्म आणि धर्माच्या आधारावर असलेल्या कर्म आधारित वर्णव्यवस्थेवर घाव घातला…..
पुढे याच शैतानांचे उर्वरित कार्य समुद्री मार्गाने येणाऱ्या इसाई मिशनरी समूहाने केले.
इसाई मिशनरी लोकांना सुद्धा आपला धर्म पसरविण्यासाठी फार यश मिळत नव्हते, म्हणूनच त्यांनी विविध प्रकारे प्रादेशिक,लैंगिक, सामाजिक आणि धार्मिक फूट पडायला सुरुवात केली. आणि सर्वात जास्त भर दिला गेला सामाजिक फूट पाडण्यावर

पूर्वी स्त्री आणि पुरुष हे दोन्ही सोबत गृहस्थ जीवन जगून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तप साधना करीत असत. आणि समाजाला आपण काय देऊ शकतो, याचे चिंतन करीत असत. त्यांच्या मधे श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद सुद्धा नव्हता. ते दोघे अर्धनारी नटेश्वराचे साधक होते. मग स्त्री – पुरुष श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद कोणी निर्माण केला ?
तर त्याची खरी सुरुवात केली गेली १३ व्या शतकामधे पश्चिमेकडून आलेल्या खलाशांनकडून , कारण त्यांच्या धर्मात तर स्त्रियांना अनेक दशके निर्जीवच समजल्या जात असे, परंतु जेव्हा भारताचे स्त्री पुरुष त्यांनी बघितले.
भारतीय पुरुष स्त्रियांना जगदंबा म्हणून पूजतात हे कुठेतरी चित्र त्यांना दिसले…. त्यांच्या मनाला हे पटले नाही, त्यांनी स्त्रीपुरूष भेद आणि स्त्री सबलीकरण सारखे खोटे मुखवटे घालून समाजात भेद निर्माण करणे सुरू केला. आणि इसाई धर्मात हिंदू स्त्रियांना प्रवेश करून त्यांच्या सोबत विवाह करून आपले संख्याबळ वाढविले…
हिंदू पुरुष हे हिंदू स्त्रियांचे शोषण करतात असा मानस समाजात आणि स्त्रियांमध्ये विशेषत रुजवला गेला. आणि स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केल्या गेले, असे अनेक पुरावे आपल्याला गोवा राज्यातील पोर्तुगीज इतिहासात मिळतील.
आणि त्या काळापासूनच हा खोटा आणि निरर्थी स्त्री पुरुषांच्या भेद सुरू झाला, आजचे Pseudo feminism हा त्यातलाच एक प्रकार आहे.
भारतीय नारी नेहमीच सबला होती. ती साक्षात जगदंबा आहे. मग स्त्री अधम असा भेद का निर्माण का केला गेला असावा … तर उत्तर एकच फक्त धर्मप्रसार आणि भारतीय समाजाचे विभाजन प्रत्येक स्तरावर करणे.
असेच नंतरच्या काळात उत्तर भारतीय – दक्षिण भारतीय भेद सुरू झाला. पुढे काही दशकातच सुवर्ण – अवर्ण भेद सुरू झाला… त्यानंतर या सर्व भेदांचे स्वरूप जातिवादाने घेतले.

जातिव्यवस्थेचे सुरुवात आणि सामाजिक एकात्मतेचे पतन ………

जातीव्यवस्था किंवा वर्णव्यवस्था समजावून घेण्याअगोदर लोकाचार आणि शास्त्राचार आपल्या लक्षात घ्यावे लागेल.
वरील दोन्ही आचार हे समाजासाठी एक नियमावली सारखे कार्य करीत असत.
जसे उदाहरणार्थ मनुस्मृती,पराशर इ. हे शास्त्राचार म्हणून
ओळखले जात असत यात ११-१२ प्रकारचे ग्रंथ येतात.
महत्वाचे म्हणजे याचे लिखाण ब्राम्हण करीत नसत याचे, लिखाण तर विषयात पारंगत व्यक्ती त्या त्या विषयाचे लिखाण करून समजासमोर ठेवत असे ..मात्र त्या सर्व ग्रंथांची जपवणूक करणे, त्यांचा योग्य सांभाळ करणे हे कार्य ब्राम्हणां कडे समाजाने सोपवले होते.
मग आता प्रश्न लोकाचाराचा … एक महाभारतातले उदाहरण आपल्याला माहिती असेल …. द्रौपदीने पाच पांडवांची विवाह केला
द्रौपदी ५ पांडवांशी विवाह करू शकते, असा नियम कुठेच शास्त्रात नव्हता. कारण भारतीय संस्कृतीत एक विवाह पद्धती होती, परंतु भारत एवढा विशाल देश त्यात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे लोकाचार असत, मग हा नियम होता लोकाचारात आणि त्याचे पालन करून तसा विवाह सुद्धा पांडवांचा द्रौपदी सोबत झाला….
आजही हिमाचल प्रदेश मधे काही गावात हि परंपरा अगदी नियमाने पाळली जाते.
त्यामुळे कुठल्याही स्मृती किंवा शास्त्रात असलेले नियम हे बळजबरीने लादलेले नव्हते… तसेच ते सर्व नियम आणि स्मृतीवचन सर्वोपरी सुद्धा नव्हते. हिंदू समाज हा “एक किताबी” नव्हता. अनेक पुराण आणि शास्त्राचे अभ्यासक आपण होतो. म्हणूनच आद्य शंकराचार्य सुद्धा अद्वैत सिद्धांत काश्मीरचे शासक असलेल्या कश्यप ऋषींच्या साहित्यातून जाणून घेतात.
भरत मुनी सारखे ऋषी ब्राम्हण नव्हते पण त्यांनी समाजाला नाट्य शास्त्र दिले …म्हणजेच त्या काळात सुद्धा वर्णव्यवस्था हि कर्मावरच आधारित होती… आणि कर्माचा विचार केला, तर भरत मुनी शतप्रतिशत ब्राम्हणच होते.
नारद मुनी आपल्या सर्वांना माहिती आहेत, आपण त्यांना ब्रम्हा पुत्र म्हणून ओळखतो,
परंतु नारद हा शब्द खऱ्या अर्थाने वनात राहणाऱ्या आपल्या वनवासी हिंदूच्या पुराणात सुरुवातीला आढळतो…. आपले दक्षिण भारतातले वनवासी बंधु नारदाला ऋषिराज म्हणून पूजतात तर काही ठिकाणी नारद हा शब्द वनवासी लोकांचे रक्षण करणारा पर्वत राज सुद्धा आहे (ब्रम्हावैवर्ता पुराण)
अशीच एकात्मता प्रत्येक वर्णात आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर भारतात होती…
म्हणूनच तर एक नाव चालविणाऱ्याची मुलगी सत्यवती चक्रवर्ती सम्राट असलेल्या राजा शांतनू सोबत अगदी सहज विवाह करू शकते … आज पासून ६००० वर्षा पूर्वी असा काळ होता … मग विचार करण्याची बाब म्हणजे जातीवाद सुरुवातीला होता की आज मोठ्याप्रमाणात आहे , हे लक्षात घेतले पाहिजे. आजची परिस्थिती अगदी विपरीत आहे.
आज एका जातीचा व्यक्ती आपली मुलगी स्वतःच्या पोटजातीत सुद्धा द्यायला खूपदा विचार करतो.
हि मानसिक गुलामी आहे, याचा पूर्ण फायदा इसाई मिशनरी पुरेपूर घेत आले आहेत….
आपली वर्णव्यवस्था हि काय पक्की व्यवस्था नव्हती ,आणि या वर्ण व्यावस्थेमधे अस्पृश्यता मुळीच नव्हतीच.

एक इस्लामिक प्रवासी इबना बतुता याने एक “रिहाला” नावाचे पुस्तक भारत दौऱ्यावर असताना लिहिले.
त्यामध्ये तो वर्णन करतो की
“असंख्य गावात आणि समाजात विशेष स्थान आणि सन्मान प्राप्त असलेले अनेक भारतीय हिंदू स्वतःचा आणि परिवाराचा जीव इस्लामिक आक्रमका पासून वाचविण्यासाठी जंगलात स्थायी झाले..
आणि पुढे ते जंगलातील परिस्थितीला अनुसरून निवास करू लागले” … असे त्या पुस्तकात वर्णन आहे.
कालांतराने ब्रिटिश सरकारने याच हिंदू समाजाला schedule tribes (ST) म्हणून घोषित केले. त्यांच्या मनात तुम्ही शोषित वर्ग आहात असे रुजवण्यासाठी आले, तुमच्यावर उच्च जातीने अत्त्याचार केलेत, असा मानस त्या काळात तयार केला आणि तो आजतागत सुरू आहे.
आज आपल्या समाजाला सांगावे लागेल … वनात गेलेले ते आपले बंधू इस्लामी आत्यचाराला सहन करून स्वतःचा धर्म आणि परिवाराचे रक्षण करण्यास यशस्वी झाले… आपले ते सर्व बंधु योद्धे आहेत, त्यांचे ऋण आपल्यावर आहेत… त्यांनी खरी संस्कृती जपून ठेवली आहे … त्यांचे सदैव आभार आपल्या मनात कायम असावे.

मूळ वनवासी लोक सुद्धा समाजातील प्रत्येक वर्गाशी मिळून मिसळून राहत होते. याचे अनेक उदाहरण आपल्या इतिहासात आहेतच…. श्रीराम आणि केवट चे उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतात, सुग्रीव आणि श्रीराम यांच्या मैत्रीचे उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतात.
मात्र ह्या मूळ वनवासी हिंदूंना समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूर करून त्यांना ईसाइ बनविण्याचे कार्य ब्रिटिशांनी केले…
आणि असेच काही SC आणि OBC वर्गांसाठी सुद्धा केल्या गेले…
उच्च जातीचा उपयोग घेऊन ब्रिटिशांनी दलीत असणाऱ्या आपल्या बंधुवर आत्यचार केले. यामगे मोठे षडयंत्र होते. आणि पुढे स्वतंत्र भारतात अश्याच मार्क्सवादी फुटीरवादी इतिहासकारांना आपल्या देशाचा इतिहास लिहिण्याचे कार्य मिळाले. त्यांनी त्यात अजूनच जातिव्यवस्था आणि वर्णभेद स्थूल करून समाज तोडण्याचे कार्य केले.
तुम्ही उच्च वर्गापासून शोषित झालेला आहात अशी जाणीव सतत भारताच्या एकात्म समाजाला देण्याचे कार्य डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी केले……..
एकंदरीत संपूर्ण समाजाचे आचरण अभ्यासून ईसाई पादरिंनी जातीव्यवस्था उदयास आणून तिला समाजात एकरूप करण्याऐवजी तिला उच्च आणि नीच … शोषित आणि शोषण करणारे या दोन भागात विभागून आपल्याला देशाला जाती नावाची कीड लावून दिली.
आणि आज सुद्धा एवढं शिक्षण घेऊन बुध्दीचा विकास करून सुद्धा या मार्क्स विचारधारी पद्धतीचा नाश आपला समाज करू शकला नाही आहे… उलट हि जातीव्यवस्था , दलीत ,वंचित, मागासलेले, आदिवासी असे शब्द समाजात चालवून … समाजाच्या एकात्मतेला सतत घाव देत आहे….
सर्व भारतीय समाज एक आहे … आपण सर्व बंधु आहोत. जर समाजात एकही वर्ग स्वतःला दलीत समजत असेल तर पूर्ण समाज दलीत आहे, जर समाजातील एकही वर्ग स्वतःला वंचित समजत असेल तर संपूर्ण समाजच वंचित आहे.

स्वतःच जातीवाद संपविण्यासाठी निघालेले पुरोगामी , जातीवाद नष्ट करण्यासाठी काहीही प्रयत्न करीत नाहीत.
अनेक पुरोगामी डंके के चोट पर जातीव्यवस्था आणि त्या बद्दल अनेक क्षेप-आक्षेप करीत असतात. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि जातीवादाचे समर्थन करून आपल्या मतपेट्यांची काळजी करायची … हा कुठला पुरोगामी महाराष्ट्र ?
आज भारत मातेचे आपण सर्व पुत्र आहोत हा भाव मनात जागृत करून संघटित भारतीचे पुत्र म्हणून जगण्याची गरज आहे.
सामाजिक समरसता आणि आत्मीय बंधुताच आपल्या भारतीय समाजाला पुनः त्या वैभवाच्या स्थानावर विराजमान करू शकते.
“जी जात नाही ती जात ” असे वाक्य समाजात रुजवून या व्यवस्थेला प्रोत्साहित केल्या पेक्षा जातीला आपल्या मनातून ,समाजातून चालते करावे ….. नाहीतर उद्याचा दिवस जातीचा असेल आणि आपल्यालाच आपल्या स्वाधर्मातून जावं लागेल……!

हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्।
मम दीक्षा हिन्दू: रक्षा,मम मंत्र: समानता।।

संदर्भ – भारतीय पुराण
– रिहला इबना बतूता
– ब्रह्मवैवर्त
– Indian caste system 1945

– संकेत राव ✍️

लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजातील वाईट प्रथा आणि गौरवशाली इतिहास तसेच इस्लाम धर्माचे अभ्यासक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.