एस जयशंकर नावाचा हिरा !

0 142

एस जयशंकर नावाचा हिरा!

विदेशमंत्री एक निष्णात राजनैतिक अधिकारी म्हणून आपण ओळखतो. तसंच एखादा माणूस किती हजरजबाबी आणि तिखट असू शकतो याचंही ते एक उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळेच २०१९ ला ते मंत्री बनले तेव्हा एका विशिष्ट वर्तुळाच्या बाहेर माहित नसलेले जयशंकर आता सामान्य भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनलेत.

एका राजकारणी नसलेल्या “करियर डिप्लोमॅट” व्यक्तीने अशी लोकप्रियता मिळवणे बदलत्या भारतीय अभिरुचीचं सुचिन्ह दर्शवते!

त्यांची वाणी विदेश दौऱ्यात फिरंगी, उद्धट “गोरी चमडी” राजकारणी आणि पत्रकारांना आसूड ओढताना विलक्षण तेजस्वी आणि धारधार होते. ३७० काढून टाकल्यावरची अमेरिकीन सिनेटर्सनी घेतलेली मुलाखत असो किंवा युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर भारताने रशियन तेल घेऊ नये म्हणुन बदमाश यूरोपियन आणि ॲपळ अप्पलपोट्या अमेरिकी पत्रकारांनी केलेला थयथयाट असो, जयशंकर यांनी त्यांना त्यांचा स्वार्थीपणा दाखवताना घेतलेली तिखट पण संयत भूमिका भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे.

काल त्यांच्या इंडिया वे पुस्तकाचं मराठी भाषांतर प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमात त्यांची प्रश्नोत्तरे सुद्धा अप्रतिम होती आणि बुध्दीला खुराक देणारी होती!

एका पत्रकाराने त्यांना विचारलं, “दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान तुम्हाला संधी वाटते, धोका वाटतो, संकट वाटतं का गळ्यात पडलेली नकोशी जबाबदारी?”
जयशंकर म्हणाले,”ती एका वास्तविकता आहे!”
मूळ इंग्लिश संभाषण असं, “Sir, bankrupt and unstable Pakistan is opportunity, liability or threat for India?”
जयशंकर म्हणाले, “It’s reality!”

सामान्य जनता एखाद्या राजनैतिक मुद्द्याकडे ज्या नजरेने बघते त्याच्या पेक्षा एक कसलेला राजनैतिक, विदेशमंत्री किती वेगळ्या कोनातून बघतो याचं हे उत्तम उदाहरण आहे!

जयशंकर यांच्याकडे बघत बघत तरुण बुद्धिमान भारतीय मळलेल्या वाटा सोडुन फॉरेन सर्व्हिसेस कडे अधिकाधिक संख्येने कडे जावोत ही अपेक्षा!

— विनय जोशी

Dr S. जयशनकार फोटो गुगल साभार.

लेखक हे कवी, गझलकार, समिक्षक आहेत. शिक्षण : बी.कॉम, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर,  एम.बी.ए. (मार्केटिंग मॅनेजमेंट).झाले असून, हायमिडीया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई येथे निर्यात व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. तसेच काव्यप्रेमी गझल मंच राज्यस्तरीय अध्यक्ष आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, डोंबिवली (कोषाध्यक्ष - वर्ष २०१९ ते २०२१). # महाराष्ट साहित्य परिषद, पुणे (डोंबिवली शाखा) # ओंजळीतील शब्दफुले साहित्यिक समुह - महाराष्ट्र # नक्षत्राचं देणं काव्यमंच - महाराष्ट्र # मराठी कविता समुह – महाराष्ट्र आशा विविध संस्था समूहावर कार्यरत आहेत. पुरस्कार : प्रितगंध फौंडेशन - मुंबई कडून साहित्यिक पुरस्कार (२०१५) कै.सौ.कुमूदिनी गडकरी पुरस्कार (२०१६) कै.वैजयंती काळे पुरस्कार (२०१६) हृदयांतर ब्लॉग आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा पुरस्कार (२०१६) कवयित्री शेवंताबाई सरकाटे स्मृती राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार (कविता संग्रह - ओंजळ) (२०१७) अस्मिता ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा लक्षवेधी पुरस्कार (२०१७) काव्यांगण प्रतिष्ठान, यवतमाळ राज्यस्तरीय कवी सम्मेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानीत (२०१७) अमृतादित्य साहित्य पुरस्कार (कविता संग्रह - मनतरंग) (२०१८) राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार - २०१८ (पारस काव्य, कला, जनजागृती संस्था - नवी मुंबई) कै.म.पां.भावे स्मृती उल्लेखनीय पुरस्कार - २०१८ "अक्षय-रजनी" राज्यस्तरीय काव्य पुरस्कार - २०१९ दापोली येथील शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०२०). आशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. कवितासंग्रह प्रकाशित - ओंजळ (२०१६) मनतरंग (प्रातिनिधीक (२०१८) (निर्मिती-संकल्पना, संपादन आणि प्रकाशन) अंत:स्थ मनात (२०२०).तसेच अनेक कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. भ्रमणध्वनी : ९८९२७५२२४२ / ७५८८४१४२३९, इ.मेल :  vijayjoshi20@hotmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.